बंद

धार्मिक स्थळे

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. महागणपती मंदिर व विठ्ठल मंदिर यामुळे माहात्म्य प्राप्त झालेले एक यात्रास्थान आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस ‘विवाहविनायक’ असे म्हटले जाते.

कसे पोहचाल ?

रेल्वे

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते.

बससेवा

स्टेशनपासून हे गाव थोडे दूर आहे. तेथे बससेवा उपलब्ध आहे. सदरचे मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी स्टेशनपासून रिक्षा किंवा घोडागाडीचा उपयोग होतो.

शिवमंदिर – अंबरनाथ

शिवमंदिर - अंबरनाथ

इ.स. 1060 साली चित्राराजा यंानी या मंदिराची स्थापना केली. व हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “अंबरनाथचे शिवमंदिर”. अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे.

कसे पोहचाल ?

रेल्वे

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदीर जवळ आहे.

वज्रेश्वरी

वज्रेश्वरी भिवंडी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. येथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्‍यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते.

कसे पोहचाल ?

रेल्वे

जवळचे रेल्वे स्टेशन – वसई (वेस्टर्न रेल्वे )

बस

ठाणे आणि वसई हून वज्रेश्वरी ला बसेस ये -जा करतात.