जिल्ह्याविषयी
महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टिने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र , उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला जगप्रसिध्द व भारताची आर्थिक राजधानी समजले जाणारे मुंबई शहर अशा जिल्हयाच्या चतु:सिमा आहेत. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांचे क्षेत्र औद्योगिक दृष्टया विकसीत असून मुंबई शहराच्या आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 720 कि.मी. किना-यापैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा जिल्हयाला लाभला आहे. भूजल […]अधिक वाचा ..